Friday, March 8, 2013

काही खर काही खोट

१. आयुष्यातल्या कोणत्याही सुखाला कवटाळून झाल्यावर त्या क्षणांच्या आठवणीने चोरटेपणा न वाटता जास्त आनंदच जेव्हा वाटत राहतो तेच खरं सुख.

२. देव पाठीराखा असतो तेव्हाच असामान्य संकटं येतात. सामान्य संकटं निवारण्यात त्याचही देवत्व सिद्ध होणार नाही.

३. कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, त्याचं चाक जमिनीत कधी रुततं तिकडेच सगळ्यांच लक्ष असतं.

४. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच शल्य म्हणतात.



लेखक:  व.पु. काळे
पुस्तक: काही खर काही खोट

No comments:

Post a Comment

Video