Friday, December 28, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ५


३३. सोनाली बेंद्रे.


३४. सोनाली कुलकर्णी.


३५. तारा देशपांडे.


३६. तेजस्विनी कोल्हापुरे.


३७. उर्मिला मातोंडकर.


३८. वर्षा उसगावकर.


३९. तनुजा.


४०. अंतरा माळी.










Tuesday, December 25, 2012

संपूर्ण बाळकराम

१. आम्हा पौर्वात्यांच्या आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचार विचार कल्पनांत जे दक्षिनोत्तर अंतर आहे ते लक्षात येते. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे इंग्रज लोक 'गरज हि शोधाकतेची आई आहे!' आस्व त्याबरहुकूम गरजेचा मारा चुकवितात आणि उलट 'अक्क्ल्वान्ताला गरज नसते' असा व्यत्यास सिद्ध करून दाखवितात.
 
2. His Verticality Went into His Horizontility” साधा अर्थ तो पडला.
 
 
लेखक: रा. ग. गडकरी.
पुस्तक: संपूर्ण बाळकराम.
 
 
 
 
 

Wednesday, December 19, 2012

ययाति

१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
 
२. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
 
३. या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
 
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.
 
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
 
६. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
 
७. इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
 
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे. 
 
 
 
 
लेखक: वि. स. खांडेकर
पुस्तक: ययाति












Thursday, December 13, 2012

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी



१. "शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे
     तो रतीला चुम्बिताही सांगेल कि आता पुरे...
     तोंडही भगवन तयाचे मला दावू नका
     न जरी मंजूर हेही माझे तया दावू नका........"

२. "पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी
      जळल्यावारी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही
     आमुचे वार्धक्य जैसे आम्ही कधी ना पहिले
     मिटलेच होते नेत्र नाही मृत्युसही मी पहिले..."

३. "तुमचाच आहे अंश भगवन मीही कुणी दुसरा नव्हे
      लोळण्या पायी तुझ्या तुमचा कुत्रा नव्हे..."

४." दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
      येऊनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
      हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी
      सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी...."













- भाऊसाहेब पाटणकर.









Friday, December 7, 2012

विद्युतप्रकाश

१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.



२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.



लेखक: वि. स. खांडेकर
पुस्तक: विद्युतप्रकाश 














Monday, November 26, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ४


२५. स्मिता पाटील


 २६. रेणुका शहाणे


२७. शोभना समर्थ


२८. राखी सावंत


२९. सीमा देव


३०. शशिकला


३१. शिल्पा शिरोडकर


३२. शुभा खोटे











Friday, November 16, 2012

मायाबाजार

१. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.


२. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझ झटकता येते. कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो.


लेखक: व. पु. काळे 
पुस्तक: मायाबाजार

Thursday, October 25, 2012

कर्मचारी

 
१. "स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने, बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या प्रांतापुरती मैत्री होते."
 
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला. विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
 
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
 
 
लेखक: व. पु. काळे
पुस्तक: कर्मचारी
 
 
 
 
 
 
 
 

Sunday, October 7, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ३

१७. नंदा


१८. नूतन


१९. पद्मिनी कोल्हापूरी


२०. पल्लवी जोशी


२१. राजश्री


२२. मुग्धा गोडसे


२३. नलिनी जयवंत


२४. नम्रता शिरोडकर











Friday, September 14, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... २

९. मधू  सप्रे


१०. ममता कुलकर्णी


११. किमी काटकर


१२. किशोरी शहाणे


१३. माधुरी दिक्षित


१४. ईशा कोप्पीकर


१५. लीला चिटणीस


१६. लीना चंदावरकर
















Thursday, August 30, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... १

 १. अर्चना जोगळेकर


२. अश्विनी भावे


३. भाग्यश्री पटवर्धन


४. गायत्री जोशी


५. अदिती गोवित्रीकर


६. अमृता खानविलकर


७. भक्ती बर्वे


८. गौरी कर्णिक














Friday, August 17, 2012

सत्तांतर

1. “कला म्हणजे जाणिव आणि नेणीव यांची लग्नगाठ”
2. “Art is a Marriage of Conscious and Unconscious.
3. काळाप्रमाणे संघर्ष हा सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.
 
 
 
 
लेखक: - व्यंकटेश माडगुळकर


 
 
 

Video